झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं शेजें आला ॥धृ०॥
गुरुकृपा निर्मळ भागीरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।
असीपदें एकत्र जेथें होती । स्वानुभाव स्नान हें मुक्तास्थिती ॥१॥
सद्बुद्धीचें घालुनि शुद्धासन । वरी सदगुरुची दया परिपुर्ण ।
शमदम विभुती चर्चुन जाण । वाचें उच्चारी केशव नारायण ॥२॥
बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां ।
भक्ति बहीण धाऊनि आली गांवा । आतां संध्या कैशी मी करुं केव्हां ॥३॥
सहज कर्में झालीं ती ब्रह्मार्पण । जन नोहें अवघा हा जनार्दन ।
ऐसें ऐकेतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणली निज खुण ॥४॥

स्थूल जीवन