वाकीभ लोगो

पुराण कथेनुसार तुकाराम महाराजांचा(sant tukaram maharaj) पृथ्वीतलावरील अवतार म्हणजे सत्ययुगातील अंबऋषी. अंबऋषी या अवताराबद्दल सांगायचे म्हणाल तर अंबऋषीस्वरूप तुकोबाराय प्रथमत: दुर्वासऋषींचे शिष्य होते. गुरू-शिष्यांमध्ये थोडय़ा प्रमाणात कलह झाला. दोघांनीही शक्तिप्रदर्शन केले. दुर्वासऋषींनी अंबऋषींवर सुदर्शन चक्र सोडले. यातून पळ काढत अंबऋषी ब्रह्मलोकांत पोहोचले; पण सुदर्शन चक्राने त्यांचा पाठलाग सोडला नाही. शेवटी ते वैकुंठात गेले. भगवान विष्णूंची शरणागती पत्करली. त्यांनी अंबऋषींना दुर्वासांना शरण जा, असे सांगितले. यानंतर दुर्वासऋषींनी सुदर्शन चक्र रोखले, मात्र तुला प्रत्येक अवतारकार्यात गर्भवास सोसावा लागेल, असा शापही दिला.

महाराजांचे चार युगांप्रमाणे अवतार, पहिल्या अवतारात म्हणजेच कृतयुगात तुकोबाराय प्रल्हादस्वरूप होते. या अवतारात त्यांचे आराध्य दैवत श्री भगवान विष्णू होते. दुस-या अवतारात त्रेतायुगात तुकोबाराय अंगदस्वरूप होते. तर तिस-या अवतारात द्वापारयुगात तुकाराम महाराज उद्धव स्वरूप होते. कलियुगात चौथ्या अवतारात ते नामदेवराव होते. तर पाचवा अवतार हा तुकाराम नावाने जगात प्रसिद्ध झाला आहे. याची साक्ष देणारा अभंग

। जे जे झाले अवतार। तुका त्यांचे बरोबर।
सत्ययुग : अंबऋषी, गुरू : दुर्वासऋषी आणि आराध्य : विष्णू
कृतयुग : प्रल्हाद, गुरू आणि आराध्य : भगवान विष्णू
त्रेतायुग : अंगद, गुरू आणि आराध्य : राम
द्वापारयुग : उद्धव, गुरू आणि आराध्य : भगवान कृष्ण
कलियुग : नामदेव, गुरू : येसोबा खेचर, आराध्य : भगवान परमात्मा पांडुरंग
कलियुग : तुकाराम, गुरू : बाबाजी चैतन्य आणि
आराध्य : भगवान परमात्मा पांडुरंग

वंशावळी

  • विश्वंभर आणि आमाई अंबिले

यांना दोन मुले हरि व मुकुंद

  • यांतील एकाचा मुलगा विठ्ठल
  • दुसऱ्याची मुले –
  • पदाजी अंबिले
  • शंकर अंबिले
  • कान्हया अंबिले
  • बोल्होबा आणि कनकाई अंबिले

यांना तीन मुले

  • सावजी (थोरला) तीर्थयात्रेला जाण्यासाठी घर सोडले.
  • तुकाराम व कान्होबा( धाकटा )

तुकाराम महाराजांचा परिवार आणि शिष्यगण – संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव तुकाराम वोल्होबा आंबिले (मोरे). तुकोबा मूळचे देहू गावचे स्थायिक होते. कुटुंबात आई कणकाई, वडील वोल्होबा मोरे, थोरला भाऊ सावजी आणि धाकला भाऊ कान्होबा असा परिवार होता. महाराजांची पहिली पत्नी रखमाबाई आणि दुसरी जिजाबाई ऊर्फ अवली. महाराज आणि रखमाबाई यांचा पहिला पुत्र संतू. यानंतर अवली हिची मुले पहिली मुलगी गंगा, दुसरा व तिसरा मुलगा भोळ्या आणि विठू,चौथी मुलगी भागीरथी.

महाराजांचे आराध्य दैवत विठोबा. महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य. महाराजांचे शिष्य नाहुजी आणि बहेनाबाई शिऊरकर. स्वर्गारोहणानंतरचे महाराजांचे शिष्य निळोबाराय व कान्होबाराय. तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतारकार्य पूर्ण करण्यास आले होते याची साक्ष देणारा अभंग

। प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी।
। उरले ते शेवटी लावी तुका।


जीवनोत्तर प्रभाव – संत तुकाराम महाराज

संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.यावरून तुकाराम महाराज पाळीत असलेल्या धर्माचे स्वरूप किती उदार होते याची कल्पना यावी.


तुकाराम महाराजांवर सद्गुरुकृपा – संत तुकाराम महाराज

तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी महाराजांना बीजमंत्र दिला. त्यांच्या कृपाशीर्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्त झाले.

। माझिये मनीचा जाणोनिया भाव। तो करी उपाव गुरूरावो।
। आवडीचा मंत्र सांगितला सोपा। जेणे नोहे गुंफा कोठे काही।


तुकाराम महाराजांना वैराग्यप्राप्ती कशी झाली..? – संत तुकाराम महाराज

तुकाराम महाराजांना साधुसंतानी विचारले, महाराज तुम्हाला वैराग्यप्राप्ती कशी झाली. यावर महाराज म्हणतात, अहो मला वैराग्यप्राप्ती झाली नाही, माझ्या विठूरायाने ती घडवून आणली. काय माझे होते जे मी गमावले, ज्यामुळे मला वैराग्य प्राप्त होईल. दुष्काळात माझी एक पत्नी अन्न अन्न करून मेली. होते नव्हते ते द्रव्य गेले, मग माझ्याकडे देवभक्तीशिवाय पर्यायच राहिला नाही. देवाला ही दुष्काळात नैवेद्य मिळत नव्हता म्हणून वाटलं भक्ती करावी. आरंभी एकादशीला कीर्तन करत होतो. पण अभ्यासात चित्त नव्हते. मी संसाराधीन होतो. संतांची पदं पाठ करून मी कीर्तन करायचो. मग सद्गुरूंनी कृपा केली. त्यांच्या वचनाने मला वैराग्य प्राप्त झाले,

महाराज म्हणतात, या संसारात मी खूप त्रासलो होतो. धनामागे पळण्याची आस मेली होती; त्यामुळे मी धन याचकांना दिले. प्रिय व्यक्तींचा सहवास सोडला आणि मी करंटा झालो. लोकांपासून दूर राहण्यासाठी मी रानावनांत एकांत शोधला.


संत तुकाराम महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश – संत तुकाराम महाराज

एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचे दर्शन, सत्संग आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी देहू या गावी गेले होते. ईश्‍वरनिष्ठ महापुरुषाला पाहून ते इतके प्रभावित झाले की, त्यांच्या कृपेची याचना करू लागले; परंतु दूरदृष्टीसंपन्न लोकसंत तुकाराम महाराजांनी त्यांना समर्थ रामदासस्वामींना शरण जाण्याचा उपदेश केला. संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना क्षात्रधर्म म्हणजे काय, हे सांगून राजधर्म समजावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तने आणि मार्गदर्शने यांतून प्रेरणा घेतली.


तुकाराम महाराज वैकुंठ गगन – संत तुकाराम महाराज

पण अनेक चरित्रकारांना तुकोबांच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबात मान्य नाही. तुकारामांचे वंशज श्रीधरमहाराज मोरे (देहूकर) यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले आहे. या पुस्तकात तुकारामांच्या प्रयाणाविषयी एक प्रकरण आहे.

श्रीधरमहाराज लिहितात- ‘इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’ असं सांगितलं. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले.सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावा ।। अशी सूचनाही केली. आणि भगवतकथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले.’

या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके 30च्या देहूगावच्या सनदेत आहे असं श्रीधरमहाराजांनी लिहिलं आहे. ‘तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.

व्हॉट्सअॅप