स्थिर करुनियां मन । वाचें गावा जनार्दन ॥१॥
तुटती बंधनें । यमयातनेची ॥२॥
ऐशी विठ्ठल माऊली । वाचे स्मरा वेळोवेळी ।
कळिकाळाची चाली । होऊं नेदी सर्वथा ॥३॥
कापालिया काळ । येथें न चले त्यांचे बळ ।
वाउगा पाल्हाळ । सांडा सांडा परता ॥४॥
धरा विश्वासा दृढ मनीं । लक्ष लावावें चरणीं ।
शरण एका जनार्दनीं । नुपेक्षी तो सर्वथा ॥५॥