नित्य नैमित्तिक कर्मे आचरावीं । तिहीं तें पावावी चित्तशुद्धि ॥१॥
चित्त स्थिर होण्या करी उपासना । भजे नारायणा एका भावें ॥२॥
विवेक वैराग्य प्राप्ति तत्प्रसादें । चित्ता लागे वेध सद्‍गुरूचा ॥३॥
सदगुरुकृपेनें पूण बोध होय । नित्य त्याचें हृदयीं धरी ॥४॥
एका जनार्दनीं ठेवूनियां मन । मनाचें उन्मन पावलासे ॥५॥