शत वरुषांची घेउनी आला चिठ्ठी । अर्ध रात्रीं खादलें उठाउठीं ॥१॥
केव्हां जपसील रामनाम वाचें । आयुष्य सरलीया पडतील यमफांसे ॥२॥
अज्ञानत्व गेलें वरुषें बारा । खेळतसे विटीदांडु भोंवरा ॥३॥
उपरी तारुण्य मदाचा ताठा । करी बैसोनि विषयाच्या चेष्टा ॥४॥
ऐशीं पन्नास वर्षे गेलीं भरोवरीं । एका जनार्दनीं पडला चौर्‍यांयशींचे फेरी ॥५॥