सम आणि विषम हीं तो काळाची फळें । भोगिल्याविण बळें न सुटती कधीं ॥१॥
वाउगी कल्पना वाउगी कल्पना । वागविती मना परम मूर्ख ॥२॥
उसनें आणि ताना जीवा वाटे गोड । देतों तें लिगाड होय मग ॥३॥
एका जनार्दनीं हाही अनुभव । सुखदुःखा ठाव याचपरी ॥४॥