हरिकथा परिसोनि जरी देखसी दोष । भुजंगा तेंचि परतले विष ॥१॥
हरिनाम ऐकतां जरी न वाटे सुख । अंतरीं तुं देख पाप आहे ॥२॥
कस्तुरीचे आळां पेरिला पलांडु । सुवास लोपोनि कैसा वाडे दुर्गधु ॥३॥
धारोष्णा पय परी ज्वरितांचें मुख । थुंकोनि सांडी म्हणे कडु वीख ॥४॥
पान लागलिया गूळ न म्हणे गोडु । गोडाचे गोड तें झालें कडु ॥५॥
एका जनार्दनीं भाव नुपजे नरा । नरदेहीं आयुष्य तेंही केला मातेरा ॥६॥