पेंदा म्हणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भेणेम गेला देशोधडी ॥१॥
देव म्हणे गोपाळ धन्य तुम्हीं बळी । पळविला बळी बाऊ तुम्हीं ॥२॥
ऐसें समाधान करी मनमोहन । एका जनार्दनीं चरणीं लागे ॥३॥