गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें । आजी यमुनेचे जळ वर्जा कां जी ॥१॥
हरी म्हणे तयातें तेथें बाऊ आला । म्हणोनि तया स्थळा नवजावें ॥२॥
ऐकोनियां पेंदा नाचतो दुपांडी । गदियांची मादि सवें घेत ॥३॥
बाऊ पहावया गडे हो अवघे चला । या कृष्णबोला राहुं नका ॥४॥
एका मागें एक गडी ते निघाले । एका जनार्दनीं आले यमुनेटीं ॥५॥