कोणी कांहीं तरी म्हणो । आम्ही न जाणो तया बोला ॥१॥
गाऊं सुखें नामावळी । सुख कल्लोळीं सर्वदां ॥२॥
नाचुं संतमेळीं सदा । कीर्तनीं गोविंदा रंजवुं ॥३॥
एका जनार्दनीं हाचि धंदा । वायां शब्दा न लागूं ॥४॥