समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें ।

हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥

सांवळीया कान्हया नको जाऊं दुरी । राहे पेरपरता परतोनि हरी ।

पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ॥२॥

तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान ।

शरण एका जनार्दने । काया वाचा मनें जाणोन ॥३॥